ऑनलाइन टिम :
शिरोळ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व समितीचे दुर्लक्षामुळे गेल्या आठ दिवसात सहा लोकांचा बळी गेला आहे. याला जबाबदार कोण वारंवार मागणी करूनही ठीक ठिकाणी गतिरोधक (speed breaker) न केल्याने वारंवार अपघात घडत आहेत शिरोळ शहरातील सर्वच तरुण मंडळ व सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या दोन वर्षापासून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना ते जनता हायस्कूल या मुख्य मार्गावर नऊ ठिकाणी गतिरोधक (speed breaker) बसविण्याची मागणी केली जात आहे. याकरिता यापूर्वी आंदोलने (Movements) करण्यात आली आहेत. नुकतेच पद्माराजे विद्यालय समोर दोघांचा बळी गेला आहे तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मोटरसायकलच्या धडकेत इसमाचा मृत्यू (Death) झाला.
ऊस गळीत हंगाम सुरू असून ऊस वाहतूक (Driving) की बरोबर शेकडो वाहनाची दररोज वर्दळ आहे. तहसीलदार कार्यालय समोर रस्ता पास करणेदेखील मुश्किल झाले आहे तर पद्माराजे विद्यालयात (school) जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे तसेच जय भवानी चौक बसवेश्वर चौक घालवाड फाटा शिरटी फाटा नांदणी रोड व आगर भाग या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.
----------------------------
Must Read
1) आजचे राशीभाविष बुधवार ,17 फेब्रुवारी २०२१..!!
2) वस्त्रनगरीतील गुन्हेगारीपुढेपोलिस हतबल..?
3) कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा