
Must Read
1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?
2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर
3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार
4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”
5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव
मागील आठवड्यात जयसिंग गायकवाड यांनी बंडाचे निशाणा फडकवून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर जयसिंग गायकवाड यांनी पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुद्धा सुरू केला होता. अखेर आज मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. ( Sharad Pawar) जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडचे खासदार तसेच पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली. 'ज्या पक्षात कसा राहू जो मान सन्मान नाही, चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट केला जातो. नितीन गडकरी यांचे काय हाल सुरू हे सगळ्यांना माहिती आहे. काही खुकांर लोकांनी भाजपचा ताबा घेतला आहे, अशी विखारी टीका गायकवाड यांनी केली.
'जिथे कोंडमार होतो तिथ राहण्यात काहीच अर्थ नाही. आता मोकळा श्वास घेत आहे. आम्ही भाजपात आंदोलनं केली, मार खाल्ला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, आणि काही नेते हे आयत्या पिठावर रेगोट्ट्या मारतात. हे तर नव्हतेच त्याचा बाप ही नव्हता', ( Sharad Pawar) असं म्हणत गायकवाड यांनी कुणाचेही नाव न घेता टीका केली.
तर सामान्य माणसासमवेत नाळ असणारा सतत लोकात असणारे जयसिंग राव हे नेते आहे. सत्ता विनम्र स्विकारायची असते तस वागायचे असते, असं म्हणत शरद पवार यांनी गायकवाड यांचं कौतुक केलं.तसंच, 'महाराष्ट्रात वेगळे पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत आहे. राज्यातील प्रत्येक घटकासोबत घेत काम करत आहे,